-------------------------------------------------------
*जाणून घ्या ! चप्पल किंवा बूट (पालथे)*
*उलटे ठेवल्यास काय होते?*
-------------------------------------------------
*चप्पल हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. चप्पल असु दे किंवा बूट यामधे जोतिष शास्त्र आणि वास्तु शास्त्र या दोन्ही मधे काही नियम सांगितली आहेत.*
१) बऱ्याचदा अस होत की आपण चप्पल घरासमोर सोडतो. किंवा आपल्या कडून चुकून चप्पल उलटी होते. अगदी अनपेक्षित पने नकळत अश्या गोष्ठी घडत असतात.
मात्र अशी पालथी पडलेला चप्पल किंवा उलटी पडलेली चप्पल आपण सरळ करुण ठेवली पाहिजे. कारण जर तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल, त्यामुळे आपल्या घरामधे विनाकरण वाद निर्माण होतात, भांडाने चालू होतात.
जर तुम्ही एखादी चप्पल दीर्घकाळ उलटीच ठेवत असाल, तुम्ही सरळ करत नसाल तर तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता. मित्रांनो विश्वास ठेवा मात्र वास्तु शास्त्र,जोतिष शास्त्र याच गोष्टीकड़े लक्ष करतात.
२) बऱ्याच वेळेला आपली चप्पल तूटते, खराब होते त्यावेळी आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करुण घेऊ म्हणून ती चपल आपन तशीच घरात ठेवतो. अगदी महिनो महीनो ती चपल तशीच पडूंन असते. मित्रांनो असा तुटलेला खराब बूट किंवा चप्पल आपल्या घरामधे अशांती निर्माण करतो. अत्यंत मोठ्या प्रमानामधे घरामधे अशांती चा वास निर्माण होतो. म्हणून अश्या चप्पल तुम्ही दुरुस्त करुण घ्या किंवा फेकून दया.
३) बऱ्याच लोकांना सवय असते की चप्पला दरवाजा जवळ उभी करुण ठेवतात. बाहेरुन आले की चप्पल दरवाजा जवळ उभी करुण येतात.
अश्या प्रकारची चूक करू नका, त्यामुळे नकारात्मक उर्ज्या घरामधे प्रवेश करते. परिणामी अश्या घरामधे माता लक्ष्मी येणे पसंद करत नाही.
४) तुम्हाला सवय असेल की आल्यावर चप्पल दारावर सोडने, व दरवाजा च्या आत येने.
अश्या या चप्पल माता लक्ष्मीला ला प्रवेश करु देत नाहीत.अश्या घरामधे कधीही प्रगति होत नाही बरकत होत नाही नवीन पैसा कधीही येत नाही.
५) मित्राचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला गिफ्ट द्यायचे आहे तर तुम्ही चुकुनही चप्पल किव्हा बूट गिफ्ट म्हणून देऊ नका. कारण अश्या प्रकारचे गिफ्ट दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या करिअर वरती खुप परिणाम होतो. त्या व्यक्तीचे कॅरिअर निर्माण होण्यामध्ये खुप अड़चन निर्माण होतात.
६) जर तुम्ही फाटके चप्पल किंवा बूट घालत असाल तर तर तुमच्या कड़े असणारे पैसा सुद्धा कमी होण्याची भीति असते. ज्या प्रगतिच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामधे सुद्धा घसरण निर्माण होऊ शकते.
म्हणून फाटक्या चप्पल फाटका बूट आपन चुकुनाही घालु नयेत.
७) आपल्या पायमधे शनि देवाचा वास असतो अस म्हणटले जाते. म्हणून ज़र तुम्ही फाटक्या चप्पल घालत असाल तर तुमच्यावर शनिदेवाचा प्रकोप होतो.
जर तुम्हाला अस वाटत असेल की शनि चा तुमच्यावर प्रकोप आहे प्रत्येक कामात शनि मधे येतो तर तुम्ही चप्पल दान करु शकता आणि शनिवार च्या सायंकाळी हा दिवस योग्य राहिल.
८ )जर आपन चामडया चे चप्पल किंवा बूट दान केल्यावर शनि आपल्यापासुन दूर जातो. शनिची वक्र दृष्टि आपल्यापासुन दूर होते असे मानले जाते.
९) जर तुमच्या चप्पल किव्हा बूट कधी हरवले ही एक अत्यंत शुभ घटना मानाली जाते. कारण अश्या चपला हरवल्याने आपले अशुभ ग्रह शुभ बनतात. परिणामी आपल्या जीवनावर त्याचा योग्य तो परिमाण होतो.
१०)परंतु जर सारख्या तुमच्या चप्पल हरवत असतील फाटत असतील तर समजून जा की शनि देवाचा तुमच्यावर कोप आहे.
------------------------------------------------
*🌹 श्री स्वामी परिवार 🌹*
-----------------------------------------------
No comments:
Post a Comment