Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 22 December 2020

चंपाषष्ठी'चे महत्व



 ---------------- -:♦:- 'चंपाषष्ठी'चे महत्व -:♦:- -------------- 


|| आज ‘चंपाषष्ठी’ ‌‍‍‌आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा 

|| अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला. 

|| ‘चंपाषष्ठी’चे महत्व अधोरेखीत करणारा संदेश सोशल 

|| मिडियावर शेअर होत आहे. या दिवसाचे काय महत्व आहे 

|| ते जाणून घ्या 


|| आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा 

|| अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. 

|| मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या 

|| नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाचा ‘मल्हारी मार्तंड’ 

|| हा एक अवतार होय.


|| पुण्याजवळ असलेल्या जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान 

|| आहे. कृतयुगात ‘मणी’ व ‘मल्ल’ या राक्षसांना ब्रह्म देवाने, 

|| “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला 

|| त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व 

|| ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून 

|| तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून 

|| देवांकडे मदत मागितली.


|| भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी 

|| ‘मार्तंड भैरवा’चे रूप घेऊन आपले ७ कोटी { येळकोट } 

|| सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते ‘मणि’ व ‘मल्ल’ या 

|| राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन 

|| अखेर मार्तंड भैरवांनी ‘मणी’ राक्षसाला त्याची छाती 

|| फोडून त्याला जमिनदोस्त केले. ‘मणी’ राक्षसाने शरण 

|| येऊन “माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे 

|| अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी इच्छा व्यक्त 

|| केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.


|| नंतर मार्तंड भैरवांनी ‘मल्ल’ राक्षसाचा पराभव केला, 

|| तेव्हा त्याने शरण जाऊन “तुमच्या नांवाआधी माझे नांव 

|| जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड 

|| भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी 

|| { मल्ल+अरी } मार्तंड असे म्हणण्यात येते. 


------------:♦ यळकोट यळकोट जय मल्हार ♦:------------



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot