---------------- -:♦:- 'चंपाषष्ठी'चे महत्व -:♦:- --------------
|| आज ‘चंपाषष्ठी’ आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा
|| अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला.
|| ‘चंपाषष्ठी’चे महत्व अधोरेखीत करणारा संदेश सोशल
|| मिडियावर शेअर होत आहे. या दिवसाचे काय महत्व आहे
|| ते जाणून घ्या
|| आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा
|| अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला.
|| मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या
|| नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाचा ‘मल्हारी मार्तंड’
|| हा एक अवतार होय.
|| पुण्याजवळ असलेल्या जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान
|| आहे. कृतयुगात ‘मणी’ व ‘मल्ल’ या राक्षसांना ब्रह्म देवाने,
|| “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला
|| त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व
|| ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून
|| तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून
|| देवांकडे मदत मागितली.
|| भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी
|| ‘मार्तंड भैरवा’चे रूप घेऊन आपले ७ कोटी { येळकोट }
|| सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते ‘मणि’ व ‘मल्ल’ या
|| राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन
|| अखेर मार्तंड भैरवांनी ‘मणी’ राक्षसाला त्याची छाती
|| फोडून त्याला जमिनदोस्त केले. ‘मणी’ राक्षसाने शरण
|| येऊन “माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे
|| अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी इच्छा व्यक्त
|| केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
|| नंतर मार्तंड भैरवांनी ‘मल्ल’ राक्षसाचा पराभव केला,
|| तेव्हा त्याने शरण जाऊन “तुमच्या नांवाआधी माझे नांव
|| जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड
|| भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी
|| { मल्ल+अरी } मार्तंड असे म्हणण्यात येते.
------------:♦ यळकोट यळकोट जय मल्हार ♦:------------
No comments:
Post a Comment