Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 2 October 2020

सुतक कसे पाळावे नियमसंपादन करा


सुतक कसे पाळावे नियमसंपादन करा

सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये  अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.

कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.

आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.

नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.

सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.

दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.

अत्तर किंवा सेंट वापरू नये.

नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.

दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.

अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.

या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.

चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्‍यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणार्‍याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपर्णे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभार्‍यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपर्णे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.


आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण .....

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot